नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा अंदाज 

नगर ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही वर्षांपासून दरही चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी फळबागांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही वर्षांपासून दरही चांगले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी फळबागांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. 

यंदा शेतकरी सिताफळ, पेरु, संत्रा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडी सुरु आहेत. विशेष म्हणजे कृषी विभाग लागवडीसाठी रोपे खरेदी करण्याचे परमीट देत नसून शेतकऱ्यांना आधी स्वखर्चाने रोपे खरेदी करावी लागत आहेत. आतापर्यंत साडेसात हजार शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत.

ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडी सुरु आहेत. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ घेता येत आहे. यंदा ‘कोरोना’मुळे अनेक कामगार गावी आले आहेत. याशिवाय सामाजिक अस्थिरता पाहून भविष्यातील विचार करता शेतीला प्राधान्य देण्याचे नियोजन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा फळबाग लागवड वाढली असल्याचा अंदाज आहे. त्यातही मागील काही वर्षांत दर चांगले मिळत असल्याने सिताफळ, पेरु, संत्रा लागवडीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदा कृषी विभाग लागवडीसाठी रोपे खरेदी करण्याचे परमीट देत नसून शेतकऱ्यांना आधी स्वखर्चाने रोपे खरेदी करावी लागत आहेत. आतापर्यंत साडेसात हजार शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. गेल्यावर्षी वर्षभरात ५१५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली. यंदा आतापर्यंत २८७ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आॅगस्ट अखेरपर्यंत सुमारे तीन हजार हेक्टरचा टप्पा पार होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाच हजार हजार शेतकऱ्यांना साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे.    भाऊसाहेब फुंडकर योजना बंद  फळबाग लागवड करण्यासाठी बहूभुधारक शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शासन राबवते. मात्र यंदा निधी नसल्याने या योजनेतून फळबाग लागवड बंद आहे. अलिकडे योजनेचा अध्यादेश काढलेला असला तरी दरवर्षीच्या निधीच्या यंदा ३३ टक्के निधी गृहित धरुनच योजना राबवण्याचा निर्णय घेण्याचे आदेश आहेत. 

प्रतिक्रिया  यंदा फळबाग लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. मागणीही अधिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे यंदा क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. चांगल्या वातावरणाचा फायदा घेत शेतकरऱ्यांनी फळबाग लागवड करावी.  - विलास नलगे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com