जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे रखडण्याची शक्यता

जळगाव ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर नियोजित सिंचन प्रकल्पांसाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. पावसाळा व इतर कारणांमुळे वाघूर, शेळगाव प्रकल्पाचे काम बंद झाले आहे. ‘कोरोना’मुळे आर्थिक संकटही आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रखडतील, अशी स्थिती आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर नियोजित सिंचन प्रकल्पांसाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. पावसाळा व इतर कारणांमुळे वाघूर, शेळगाव प्रकल्पाचे काम बंद झाले आहे. ‘कोरोना’मुळे आर्थिक संकटही आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रखडतील, अशी स्थिती आहे. 

वाघूर प्रकल्पाचे काम वेगात सुरू होते. शेतांमध्ये बंदिस्त जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. जळगाव, भुसावळ आदी भागात हे काम हाती घेतले आहे. दोन वर्षे हे काम गतीने सुरू आहे. त्यासंबधी गावोगावी पाणी व्यवस्थापन समित्यांची स्थापनादेखील झाली आहे. हे काम गतीने सुरू असले तरी पावसाळ्यात शेतांमध्ये यंत्रणा राबविणे शक्य नाही. यामुळे हे काम बंद करावे लागले आहे. हे काम आता पुढील वर्षी रब्बी हंगामानंतर सुरू होईल, अशी स्थिती आहे.

तसेच केंद्र सरकारने जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प म्हणून गिरणा नदीवर बलून बंधारे उभारण्याचे नियोजन केले आहे. सात बंधारे तयार होणार असून, त्यासंबंधी सर्व मान्यता मिळाल्या आहेत. परंतु प्रकल्पासाठी निधी मंजूर झालेला नाही. या प्रकल्पामुळे सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच किमान १०० गावांमधील पाणीटंचाई दूर होणार आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, जळगाव तालुक्यांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. कोरोनामुळे वित्तीय संकट असल्याने पुढेही हा प्रकल्प मार्गी लागणे कठीण आहे. यामुळे या प्रकल्पाबाबतची आशा मावळली आहे.    प्रकल्प दुर्लक्षित; शेतकरी नाराज केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील खारिया गोटी येथे तापी नदीवर महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासंबंधीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा मंजूर झालेला नाही. त्यासंबंधीचे कामही आता रेंगाळले आहे. जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प दुर्लक्षित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पांसाठी निधी मंजूर करून काम हाती घेतले पाहिजे. जिल्ह्यात एकही नवा प्रकल्प मागील अनेक वर्षांत पूर्ण झालेला नाही. शेळगाव प्रकल्पाचे काम गतीने सुरू होते. परंतु त्याचे काम आता पावसाळ्यामुळे बंद झाले आहे. २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्याचे दावे लोकप्रतिनिधींनी केले होते. परंतु किमान दोन वर्षात हा प्रकल्पदेखील पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com