कर्जमाफीचा लाभ अत्यंत कमी शेतकऱ्यांना मिळेल : राजू शेट्टी

शेतीमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर निघू शकतील. - राजू शेट्टी, माजी खासदार
बुलडाणा येथे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी
बुलडाणा येथे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी

बुलडाणा  ः  राज्य सरकारने जी कर्जमाफी केली ती अत्यंत तकलादू व शेतकऱ्यांना निराश करणारी आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. ती तर मिळालीच नाही; मात्र या कर्जमाफीचा फायदासुद्धा शेतकऱ्यांना तितकासा होईल असे वाटत नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

बुलडाणा दौऱ्यावर आले असता श्री. शेट्टी यांनी शनिवारी (ता. ८) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीला संघटनेचे नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. या वेळी श्री. शेट्टी म्हणाले, की कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्य आहे. त्यामुळे त्यांना कळेल की शेतकऱ्यांमध्ये किती आक्रोश आहे. यानंतरच सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडतील. कारण, सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली ती अवघ्या १० ते १५ टक्के शेतकऱ्यांना फायदा देणारी आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com