अखेर ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वांगी, जि. सांगली  ः वांगी (ता. कडेगाव) परिसरातील शेतकऱ्यांच्या उठावानंतर उशिरा का होईना ताकारी उपसा जलसिंचन योजना शुक्रवारपासून (ता.२७) सुरू झाली आहे. हे पाणी प्राधान्याने प्रथमतः कुंभारगाव ते वांगीपर्यंतच ० ते २१ कि. मी. साठी सलग सात दिवस सोडले जाणार आहे. 

मागील महिनाभरापासून परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यानंतर शेतकरी चिंतेत होते. ताकारी योजना कधी सुरू होणार? याची शाश्वती नव्हती. अखेर शासनाने यापूर्वी टंचाईमधून सोडलेल्या पाण्याची सुमारे ११ कोटी रुपये थकबाकी शासनाकडून भरण्याची हमी आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम यांनी घेतल्यानंतर सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी ‘ताकारी’बाबत हिरवा सिग्नल दिला. महिनाभराच्या प्रदीर्घ मागणीनंतर आणि विविध अडचणींवर मात करीत पाणी सुरू करण्यात कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. हे पाणी शुक्रवारी सकाळीच सुरू होणार होते.

मात्र, पंपांच्या किरकोळ दुरुस्ती करून दुपारी ३ वाजता टप्पा १ वरील ४ पंप सुरू करून पाणी टप्पा २ सागरेश्वरमधील संतुलन जलाशयात सोडण्यात आले. याठिकाणी आवश्‍यक पाणीसाठा होताच संध्याकाळी ५ वाजता टप्पा २ वरील ३ पंप सुरू करण्यात येऊन मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. सोडण्यात आलेले पाणी सध्या मुख्य कालव्याच्या कि. मी. क्र. २१ पर्यंतच सोडले जाणार आहे. या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील बारमाही बागायती पिके, पाणीपुरवठा योजना आणि रब्बी हंगामातील वाढीव क्षेत्रासाठी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com