नाशिकमधून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वे रवाना

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने दळणवळणच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक परप्रांतीय नागरिक गावाच्या दिशेने पायी निघाले होते. त्यांना नाशिकमध्ये अडवून निवारा गृहांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधील जवळपास १२०० च्या आसपास आसलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना भोपाळ व लखनऊसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सोडलेल्या या पहिल्या रेल्वे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता.२) सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
मजूर कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी मार्गस्थ केली.
मजूर कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी मार्गस्थ केली.

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने दळणवळणच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक परप्रांतीय नागरिक गावाच्या दिशेने पायी निघाले होते. त्यांना नाशिकमध्ये अडवून निवारा गृहांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधील जवळपास १२०० च्या आसपास आसलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना भोपाळ व लखनऊसाठी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सोडलेल्या या पहिल्या रेल्वे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता.२) सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

नाशिकमधील निवारागृहामध्ये परप्रांतीय कामगारांना ठेवण्यात आले होते. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून मध्य प्रदेशातील कामगारांना घेऊन एक गाडी शुक्रवारी (ता.१) रात्री साडे नऊ वाजता रवाना झाली होती. त्यातून ३३९ नागरिकांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्तरप्रदेशातील नागरिकांना घेऊन शनिवारी (ता.२) विशेष रेल्वे गाडी सकाळी साडे दहा वाजता लखनऊच्या दिशेने रवाना करण्यात आली. यामध्ये ८३९ नागरिक सोडण्यात आले आहेत.

सकाळी गावी जाण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व मजूर व कामगारांना विशेष बसने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. रेल्वे गाडीची निर्जंतूक प्रक्रिया केल्यानंतर प्रवाशांना गाडीत बसवून सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढला आहे. या अडचणीमुळे परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रवासादरम्यान भोजन,पाणी व खबरदारी साठी मास्क या सर्व सुविधा त्यांना देण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान गोंधळ होणार नाही,याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com