नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री पुन्हा बंद

नगर ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि तुटवडा याचा विचार करुन बाजार समितीच्या विनंतीवरुन नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात भाजीपाला, फळे लिलाव करण्याला रविवारी (ता.२९) सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी (ता.३०) सकाळी बाजार समितीच्या नेप्ती बाजारात भाजीपाला, फळे विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खरेदीदारांपेक्षा अन्य लोकांची गर्दी अधिक झाली. गर्दी अटोक्यात येत नसल्याने पुन्हा भाजीपाल्याची खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनीही लिलाव करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि तुटवडा याचा विचार करुन बाजार समितीच्या विनंतीवरुन नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात भाजीपाला, फळे लिलाव करण्याला रविवारी (ता.२९) सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी (ता.३०) सकाळी बाजार समितीच्या नेप्ती बाजारात भाजीपाला, फळे विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र खरेदीदारांपेक्षा अन्य लोकांची गर्दी अधिक झाली. गर्दी अटोक्यात येत नसल्याने पुन्हा भाजीपाल्याची खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनीही लिलाव करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसांपासून लाॅकडाऊन सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जीवनाश्यक वस्तू असल्याने बाजार समितीत भाजीपाला लिलाव सुरु ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र भाजीपाला बाजार सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला खेरदी-विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र लोकांची गैरसोय, शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने व्यापारी, हमाल, किरकोळ खरेदीदार आणि शेतकरी यांनाच बाजार समितीत प्रवेश देऊन गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना करीत सोमवारपासून भाजीपाला लिलाव, खरेदी-विक्री सुरु करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली.

नेप्ती उपबाजाराचे अंतर नगर शहरापासून दहा किलोमीटर आहे. येथे सोमवारी सकाळी भाजीपाल्याचे लिलाव सुरु झाले. मात्र चार-पाच व्यापारी वगळता अन्य व्यापारी आले नाहीत. साधारण पंचवीस ते तीस गाड्यांची आवक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला, फळांची विक्री केली. मात्र शहराबाहेर असूनही किरकोळ खरेदीदारांसह अन्य नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. ही गर्दी अटोक्यात येत नसल्याने सकाळी सात वाजताच भाजीपाला- फळांची खरेदी-विक्री थांबवली.

उपाययोजना करुनही गर्दीवर नियंत्रण मिळत नाही. नागरिकही सांगून गर्दी करत असल्याने आजपासून (मंगळवार) पु्न्हा जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करुन बाजार समितीत भाजीपाला, फळांचे लिलाव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com