लातुरात किराणा दुकानांतून होणार भाजीपाला विक्री 

लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा जिल्ह्यात पुरता पालापाचोळा झाला आहे. भाजीपाला व फळे विक्री व खरेदीचे कारण पुढे करून नागरिक संचारबंदीतही मुक्त वावर करत आहेत. यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भाजीपाला व फळे विक्रीला आजपासून (ता. ३१) बंदी घातली असून, आता केवळ किराणा व स्वस्त धान्य दुकानांतून दुपारी दोन वाजेपर्यंतच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा जिल्ह्यात पुरता पालापाचोळा झाला आहे. भाजीपाला व फळे विक्री व खरेदीचे कारण पुढे करून नागरिक संचारबंदीतही मुक्त वावर करत आहेत. यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भाजीपाला व फळे विक्रीला आजपासून (ता. ३१) बंदी घातली असून, आता केवळ किराणा व स्वस्त धान्य दुकानांतून दुपारी दोन वाजेपर्यंतच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे.   

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. याचा आधार घेऊन नागरिक भाजीपाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी करू लागले. त्यांना आवर घालण्यासाठी व सुरक्षित सामाजिक अंतराला प्राधान्य देऊन जिल्हा प्रशासनाने गेल्या आठ दिवसांत विविध उपाययोजना केल्या. यात विविध ठिकाणी जागा आखणी करून देणे, ईदगाह व दयानंद महाविद्यालयाचा परिसर विक्रेत्यांसाठी अधिग्रहीत करणे या उपाययोजनांचा समावेश होता. मात्र, विक्रेते व नागरिकांनी त्या धुळीस मिळवल्याने गर्दी कमी होण्याऐवजी वाढली. भाजीपाला व फळे विक्रीला शिस्त लावण्यात आठ दिवस ७० टक्के उर्जा खर्च करूनही फायदा झाला नाही. यातच रविवारी (ता. २९) जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी शहरात फिरून भाजीपाला व फळे विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना धक्काच बसला. विक्रेत्यांत अचानक वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले. काल, परवापर्यंत मजुरी करणारेही भाजीपाला विक्री करत असल्याचे आढळून आले. यामुळेच कोरोना संसर्ग रोखण्याची संचारबंदीची उपाययोजना फुसका बार ठरू लागली होती.

यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेली भाजीपाला व फळ विक्री बंद केली असून आता किराणा दुकान व स्वस्त धान्य दुकानांतूनच भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी दिली आहे. नोंदणीकृत हातगाडा व्यावसायिक तसेच उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर फिरून भाजीपाला व फळ विक्री करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबत किराणा दुकान, स्वस्त धान्य दुकान व सुपर मार्केटमधूनही दुपार दोनपर्यंत आणि सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन फळे व भाजीपाला विकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांची भाजीपाला व फळे जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com