सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार : मंत्री विजय वडेट्टीवार

शेती आणि बेरोजगारी हे महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील दोन मुख्य मुद्दे आहेत. शेती सिंचनाला प्राथमिकता देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. - विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसनमंत्री.
मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्याकरिता सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता तीन वर्ष कालावधीचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखणार,’’ असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेटमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच जिल्हा दौरा आले होते. कार्यकर्त्यांच्या स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी श्री. वडेट्टीवार म्हणाले, की ‘‘कॅबिनेटमध्ये जागतिक बॅंकेच्या निधीतून स्मार्ट प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प शेतकरी आणि बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येत आहे. शेतकरी आणि व्यापारी यामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्याचे फायद्यात रूपांतर करणे हा देखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. ज्या भागात जी पिके घेतली जातात. त्या भागात त्याच पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यावर देखील सरकार भर देणार आहे. त्यासाठी देखील निधीची तरतूद या प्रकल्पात आहे.

शेतीसोबतच जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवे उद्योग आणण्यावर भर राहील. चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीत सुमारे १५० उद्योग पाच ते सात वर्षात बंद पडले. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी नव्या नामांकित उद्योगांना आमंत्रण दिले जाईल, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com