नगर जिल्ह्यात ५५ टॅंकरने पाणी पुरवठा

नगर ः सध्या वाढत्या उन्हाबरोबरच गावशिवारात पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील ४५ गावे, १९२ वाड्यावस्त्यांवरील एक लाख एक हजार ९०९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः सध्या वाढत्या उन्हाबरोबरच गावशिवारात पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील ४५ गावे, १९२ वाड्यावस्त्यांवरील एक लाख एक हजार ९०९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.

गतवर्षी पावसाने कहर केला. टॅंकरच्या आकड्याने गेल्या अठरा वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करीत उच्चांकी आकडा गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील ५७२ गावे व ३२०० वाड्यावस्त्यांवरील १३ लाख ४९ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ८२७ टॅंकर धावत होते. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी परिस्थिती चांगली राहिल्याने टॅंकरची मागणी उशिरा आली.

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यासाठी सुरवात झाली. सुरवातीला टॅंकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची व्यस्तता लक्षात घेऊन सरकारने टॅंकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे दिले. आजअखेर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  

तालुकानिहाय टॅंकर ः संगमनेर-५,नगर-१०,पारनेर-११,पाथर्डी-२,कर्जत-५,जामखेड-१८, श्रीगोंदे-४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com