तारळे भागात भात काढणी अंतिम

Finalization of paddy harvest in tarale areas
Finalization of paddy harvest in tarale areas

तारळे, जि. सातारा : सध्या भात पिकाची काढणी, झोडणी अंतिम टप्प्यात आहे. पावसाने खरीप पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भात पिकाचे संमिश्र उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. लांबलेला परतीच्या पावसाने सुगीही लांबली. पावसामुळे उत्पन्नावर विपरित परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

सुगीला महिन्यापासून सुरवात झाली. मात्र, परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढविल्याने पिकांचे सुरवातीला सोयाबीन काढणीला सुरवात झाली. सोयाबीन काढणीदरम्यान जोरदार परतीचा पाऊस झाल्याने खरीप धुवून नेला. त्यामुळे राने मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग केली. लगेचच रब्बीच्या पेरण्यांची गडबड सुरू झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सुगीची कामे हातघाईवर आली होती; मात्र पावसाने दीर्घकाळ लावलेल्या हजेरीने त्यात खोळंबा झाला. त्यामुळे  सुगी लांबली असून, तारळे विभागात भात काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तारळे विभागातील डोंगरी भागात मुख्यत्वे भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील लोकांचे हेच प्रमुख पीक आहे. विभागात सुमारे तीन हजार हेक्‍टरवर भात पीक घेतले जाते. दोन हजार ५०० हेक्‍टरवर लागण पध्दतीने तर सुमारे ५०० हेक्‍टरवर पेरणीव्दारे पीक घेतले जाते.

शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे डोळे  अतिपावसाने भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड ज्वारी व कडधान्य वाहून गेले. त्यासाठी शेतकऱ्यांनी घातलेले पैसेही निघाले नाहीत. भात पिकाकडून शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या आशा होत्या. मात्र, त्याही फोल ठरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे असल्याने ते आता सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com