खासगी विमा कंपन्यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वीची विमा भरपाई अजूनही दिलेली नाही. 'पीक नुकसानीच्या पूर्वसूचना मुदतीत दिल्या नसल्याचे कारण याबाबत खासगी कंपन्या सांगत आहेत.
मात्र आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. गुरुवारी (ता. १६) झालेल्या सुनावणीत ‘आधी २०० कोटी रुपये अनामत जमा करा; नंतर सुनावणी घेऊ,’ असे निर्देश न्यायालयाने विमा कंपनीला दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे खरीप २०२० हंगामात पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आत दिलेल्या ५.२१ लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली होती. मात्र पूर्वसूचना न दिलेले पण पिकाचे नुकसान झालेले ६४ लाख शेतकरी राज्यभर होते.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) अखत्यारित पीक पंचनामे करून या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत दिली गेली. तथापि, विमा भरपाई मिळालीच नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात देखील अशा सव्वातीन लाख शेतकऱ्यांना पूर्वसूचना न दिल्याचे कारण देत बजाज अलियान्झ कंपनीने भरपाई नाकारली. त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.