जास्त नत्र असलेला चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यांना नायट्रेटची विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. हा नायट्रेट युक्त चारा पोटात गेल्यानंतर रक्तात मिसळेपर्यंत नायट्राईटमध्ये रुपांतरीत होत असतो.
नायट्राईट रक्तातील हिमोग्लोबिन बरोबर संयोग पावते आणि मेट हिमोग्लोबिन तयार होते. असे झाल्याने रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
तीव्र विषबाधा झालेली असल्यास, जनावरे कोणतीही लक्षणे न दाखविता मृत्युमुखी पडतात. विषबाधेची तीव्रता मध्यम स्वरुपाची असल्यास, जनावरांना श्वसनास त्रास होतो.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने, जनावरांचा गुदमरून मृत्यु होतो. चाऱ्यातील नायट्राईटचे प्रमाण १.५ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जनावरांच्या आरोग्यास घातक असते.