गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग खुरांच्या आजारास कारणीभूत ठरत असतो. पावसाळ्यात सर्वत्र झालेला चिखल, या चिखलातून जनावरांना चरायला नेल्याने, तसेच गोठ्यात सततचा असणारा ओलावा खुरांना संसर्ग होण्यास कारणीभूत असतो.
बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्तसंचार गोठ्यात जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. जनावरे शेणात आणि मूत्रात जास्त वेळ उभी राहिल्यास खुरे नरम पडतात. नरम पडलेली खुरे आजारास कारणीभूत ठरतात.
नरम पडलेल्या खुरांना लवकर भेगा पडतात. भेगांमध्ये जीवाणू संसर्ग होऊन खुरांचा दाह सुरु होतो. खुरांना संसर्ग झाल्याने, त्यातून सडल्यासारखा वास यायला लागतो.
जनावरांची खुरे वर्षातून एकदा, पावसाळ्याआधी योग्य प्रकारे तपासून घ्यावीत. खुरांची कमी जास्त वाढ झाल्याने, जनावरांना त्यांचे वजन सर्व पायांवर संतुलितपणे पेलणे अवघड जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.