पावसाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं असतं. ओलसर वातावरणात सूक्ष्म जिवाणूंची वाढही झपाट्याने होत असते. परिणामी पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागण होत असते.
आजाराची तीव्रता जास्त असल्यास जनावरे दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचं आहे. पावसाळ्यात आपल्या पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, पीपीआर या रोगांची बाधा होत असते. या रोगांविरुद्ध लसीचा पुरवठा पावसाळ्यात पशुसंवर्धन खात्यामार्फत दरवर्षी केला जातो.
वेळेत लसीकरण केल्यास आपल्या पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करता येईल. मात्र लसीकरणाआधी आपल्या पशुधनाचे जंत निर्मुलन केल्यास चांगला फायदा दिसून येतो. शेतकऱ्याकडील गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांसारखी जनावरे घटसर्प, फऱ्या, फाशी, आंत्रविषार यांसारख्या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी मृत्यु पावतात.
जनावरांना या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास फारसा वेळ मिळत नाही. बाधित जनावरांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा मृत्यु होऊन, शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते. यासर्व रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचं आहे. त्यामुळे त्या विशिष्ट रोगाची साथ आल्यानंतर देखील, जनावरांमध्ये त्या रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती तयार झालेली असते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.