दशेरी आणि इतर प्रकारच्या आंबा प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली आहे.
उत्पादन घटल्यामुळे आंब्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात दरवर्षी सरासरी ३५ ते ४५ लाख टन आंब्याचे उत्पादन होते. प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्यामुळे यंदा राज्यातील आंब्याचे उत्पादन १० ते १२ लाख टनांवर सीमित झाले आहे.
त्यामुळे बाजारात आंबा चढ्या दराने विकल्या जात आहे. आंबा प्रेमींना आंब्यासाठी जास्त आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
फेब्रुवारी आणि मार्च या मोहोर येण्याच्या मोसमातील उच्चतम तापमानामुळे आंबा उत्पादनात घट झाली आहे. या मोसमात ३० ते ३५ अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. प्रत्यक्षात या मोसमात पारा ४० अंश सेल्सियसवर गेल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले.
लखनौमधील मलिहाबाद हे आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथला दशेरी आंबा त्याच्या विशिष्ट चवीमुळे जगभरात ओळखल्या जातो. यावर्षी हजारो आंबा उत्पादकांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हवामानतज्ज्ञांच्या मते यावर्षीचा मार्च महिना हा गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे तर यंदाच्या एप्रिल महिन्यातील तापमानही ५० वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.