आपल्या देशात दरवर्षी खुप मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष उपलब्ध होतात. यापैकी बहुतांशी अवशेष जाळून टाकले जातात.
पिकांचे अवशेष दीर्घकाळापर्यंत जाळल्यास त्यातील कार्बन व नायट्रोजन निघून जाते. दरवर्षी जवळपास ७० टक्के कार्बन आणि ०.६६ टक्के मिथेन हवेत उडून जात असतो.
उपलब्ध पिकांच्या अवशेषांचा वापर जमिनीवर आच्छादन देण्यासाठी करू शकतो. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
जास्तीच्या कार्बन डाय ऑक्साईडमुळे वातावरणातील तापमान वाढीस चालना मिळते. पिक अवशेषांमध्ये असलेल्या कर्बाचा ऱ्हास होतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.