ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस

संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही, देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भात लागवडीत (Paddy Cultivation) घट झाली.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Kharif Crops
Kharif CropsAgrowon

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरच्या उत्तरार्धातही सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला. या काळात सरासरीच्या ९४ ते १०४ टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल, असा हवामानशास्त्र विभागाचा कयास असून पावसाचे हे प्रमाण भात लागवडीसाठी पोषक ठरेल.या काळात सरासरीच्या ९४ ते १०४ टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल, असा हवामानशास्त्र विभागाचा कयास असून पावसाचे हे प्रमाण भात लागवडीसाठी पोषक ठरेल.

Cotton
CottonAgrowon

पेरण्यांचा पॅटर्नही गेल्या वर्षीपेक्षा फार बदललेला नाही. शेतकऱ्यांनी तुरीपेक्षा मुग, उडीद आणि इतर कडधान्याला पसंती दिलीय. ऑगस्टच्या मध्यापर्यंत पेरण्या सुरु राहतील.खरीपातील उत्पादनात वाढ झाली तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे फास्ट मूव्हींग कन्झ्युमर गुड्स (FMCG) आणि ट्रॅक्टर्स आदींची विक्री वाढते. त्याचा एकूणच आर्थिक विकासावरही सकारात्मक परिणाम होतो.

Dam
DamAgrowon

समाधानकारक पावसामुळे केवळ खरीपातील उत्पादनच वाढणार नसून रब्बी अथवा हिवाळी हंगामासाठी पोषक आर्द्रता निर्माण होणार आहे. देशभरातील प्रमुख १४९ जलाशयांतील जुलै अखेरीस मागाच्यावर्षीपेक्षा १९ टक्के अधिकचा पाणीसाठा उपलब्ध आहे.

pulses
pulsesAgrowon

कृषीमालाच्या किमतीनुसार शेतकऱ्यांकडून पिकांच्या लागवडीस प्राधान्य दिले जात असल्याचे संकेत आहेत. हमीभावापेक्षा (MSP) कमी दर मिळणाऱ्या कडधान्य लागवडीऐवजी शेतकरी हमीभावापेक्षा जास्त दर मिळणाऱ्या सोयाबीन (Soybean) आणि कापसासारख्या (Cotton) नगदी पिकांकडे वळले आहेत.

Water Storage
Water StorageAgrowon

मॉन्सूनच्या असंतुलित वाटचालीमुळे, पूर्व भागातील जलाशयांमधील साठा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे आणि गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात कमी भरतो. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार (Central Water Commission) दक्षिण, पश्चिम आणि मध्य प्रांतातील जलसाठा गेल्या वर्षीच्या आणि दशकातील पातळीपेक्षा चांगला ठरला आहे.

Soybean
SoybeanAgrowon

२०२२-२०२३ (जुलै ते जुन) च्या खरीपातील धान्य उत्पादनाचे १६३. १५ दशलक्ष टनांचे उद्दिष्ट गाठता येणार आहे. २०२०-२०२१ मधील धान्य उत्पादनाच्या तिसऱ्या अंदाजापेक्षा (१५४.९३ दशलक्ष टन) हे प्रमाण ५ टक्क्यांनी अधिक असणार आहे. जुलै अखेरीस देशभरात ८२.३४ दशलक्ष हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. गेल्यावर्षी याच कालावधीत त्यापेक्षा २ टक्के कमी क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com