साखरेच्या खरेदीसाठी भारताला पसंत

साखर खरेदीदारांसाठी भारत हा हक्काचा स्त्रोत बनत आहे. विशेषत: पांढऱ्या साखरेच्या पुरवठ्यासाठी खरेदीदारांकडून भारताला पसंती मिळताना दिसत आहे. कच्च्या तेलांच्या किमतीतील चढ-उतार, मालवाहतुकीच्या खर्चात वाढीची शक्यता अशा विविध कारणांमुळे खरेदीदार साखरेच्या खात्रीदायक, सुरक्षित विक्रेत्याच्या शोधात आहेत.
sugar
sugar

साखर खरेदीदारांसाठी भारत हा हक्काचा स्त्रोत बनत आहे. विशेषत: पांढऱ्या साखरेच्या पुरवठ्यासाठी खरेदीदारांकडून भारताला पसंती मिळताना दिसत आहे. कच्च्या तेलांच्या किमतीतील चढ-उतार, मालवाहतुकीच्या खर्चात वाढीची शक्यता अशा विविध कारणांमुळे खरेदीदार साखरेच्या खात्रीदायक, सुरक्षित विक्रेत्याच्या शोधात आहेत. हिंदू बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचा-  ब्राझीलमध्ये साखर उत्पादन घटीचा अंदाज; भारतीय साखरेला होणार फायदा? गेल्या तीन वर्षात जागतिक बाजारात साखरेचा (sugar)  विश्वासार्ह निर्यातदार म्हणून भारताची ओळख बनली आहे. त्यामुळे विविध देशांना विशेषत: आखाती देशांमधून भारतीय साखरेला पसंती मिळत असल्याची माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे (All India Sugar Traders Association) अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी (Prafful Vitthal) यांनी दिली आहे. रमजानच्या सणामुळे मागणीत वाढ झाल्याने भारतीय साखरेच्या निर्यातीला (Export) बळ मिळाल्याचेही ते म्हणाले.   रमजानमुळे मागणी वाढली - रमजानच्या सणापर्यंत साखरेसह खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होते. सध्या भारतीय साखरेला बांगलादेश (Bangladesh), मलेशिया (Maleshiya), इंडोनेशिया (Indoneshiya), पश्चिम आशिया आफ्रिकेतून (Africa) मागणी आहे. गेल्या आठवड्यात विशेषत: रशिया-युक्रेनमधील संघर्ष वाढल्यानंतर भारताकडे पाच लाख टन साखरेची मागणी करण्यात आल्याचे बल्क लॉजीक्सचे संचालक विद्या सागर यांनी म्हटलंय . सध्या मागणी वाढत असली तरीही व्यापारी यापूर्वीच्या कराराची पूर्तता करण्यात व्यस्त असल्यामुळे नवे करार करत नसल्याचंही सागर म्हणालेत. ''जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा आहे. गरज पूर्ण करण्यासाठी खरेदीदारांच्या नजरा भारत आणि ब्राझीलकडे लागल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रति बॅरलच्यावर गेल्यामुळे ब्राझिलचा ऊस इथेनॉलकडे वळवला जात आहे. ज्यामुळे भारतीय साखरेच्या निर्यातीची संधी वाढल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच इस्माचे महासंचालक अबिनाश वर्मा म्हणालेत.   गेल्याच आठवड्यात इस्माने साखर निर्यातीचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार ६० लाख टनांऐवजी ७५ लाख टन निर्यतीची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी भारतातून ७१ लाख टन साखर निर्यात झाली होती. दरम्यान, देशातील गाळप हंमाम लवकरच संपणार आहे. कच्च्या साखरेचे उत्पादन जवळपास पूर्ण झाले आहे. ते या महिन्याच्या अखेरीस संपण्याची अपेक्षा असल्याचे वर्मा म्हणाले. जास्त उत्पादनामुळे यावर्षी भारतीय साखर उद्योगाला चांगले दिवस आहेत. गेल्या आठवड्यात इस्माने यावर्षीच्या साखर उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. इस्माच्या अंदाजानुसार, गेल्या वर्षीच्या ३१० लाख टनांच्या तुलनेत यावर्षी देशात ३३३ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे. भारतीय साखर उद्योग देशांतर्गत गरज, निर्यात आणि इथेनॉल उत्पादन असा त्रिस्तरीय बनल्याचे विठलानी म्हणतात. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे सहाजिकच उत्पादनात वाढ झाल्याचे सागर यांनी सांगितले आहे. उद्योगाची क्षमता वाढवली जात असून नवीन आसवणी प्रकल्प उभारल्या जात असल्याचेही सागर यांनी नमूद केलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com