
प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक समृद्ध खजिना म्हणून मोड आलेली कडधान्ये ओळखली जातात. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपली जीवनशैली बदलेली आहे. या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या स्वयंपाकघरातील पोषण खजिना हरवत चालला आहे. या पोषण खजिन्याची जागा आता जंक फूड जसे, पिझ्झा, ब्रेड, बर्गर, सँडविच तसेच अधिक मसालेदार चमचमीत खाद्यपदार्थांनी घेतली आहे. पूर्वा आपल्या सकाळच्या न्याहारीमध्ये मोड आलेले कडधान्यांचा समावेश असायचा. मात्र काळानुरूप त्यात बदल होत गेला. आणि त्यांची जागा या जंक फूडने घेतली. त्यामुळे आहारातील पोषणयुक्त घटकांचा दर्जा खालावत चालला आहे. त्यासाठी मोड आणलेले कडधान्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. कडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत. कडधान्ये प्रथिने, शारीरिक ऊर्जा, शरीरासाठी पोषक आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवितात. प्रथिने शरीराच्या बांधणीचे काम करतात. मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे
कडधान्यातील अपोषक घटक मोड न आलेल्या कडधान्यांमध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात.
आहारातील महत्त्व सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वांत हलके कडधान्य म्हणजे मटकी आणि त्यानंतर मूग, चवळी येतात. उडीद, हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला अत्यंत कठीण असतात. कडधान्यात भरपूर पोषक तत्त्वे असतात.
- शुभांगी वाटाणे, ९४०४०७५३९७ (गृहविज्ञान शाखा, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.