
बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या शासकीय यंत्रणा, संशोधन संस्था, विस्तार संस्था मागे पडतात. आजही त्या पारंपरिक कोषामध्ये गुरफटलेल्या दिसतात. अर्थात, त्यांच्या उदरनिर्वाह हा शासनाच्या अनुदानावर होतो. त्यांना स्वतःला जागतिक स्पर्धेत टिकण्याची आवश्यकता वाटत नाही. त्या तुलनेमध्ये खासगी कंपन्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी बाजारपेठेतील मागणीनुसार वेळोवेळी बदल करावे लागतात. त्यासाठी त्यांना नेहमी पीक, तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसार, अर्थपुरवठा, विक्रीव्यवस्था, प्रक्रिया, साठवणूक आणि विमा यांसारख्या अनेक बाबींवर सतत कार्य करत राहावे लागते. त्यांचा उद्देश हा व्यापारी असतो. त्यांच्या व्यापाराचा तंबू ज्यांच्या जिवावर उभा असतो, असे दोन्हीही स्तंभ म्हणजेच ग्राहक आणि उत्पादक. आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी या दोन्ही घटकांच्या मानसिकतेचा, त्यांच्या शाश्वततेचा आणि भविष्याचा विचार करावाच लागतो. कारण तात्पुरत्या फायद्याच्या उद्देशाने एखादा निर्णय घेतला आणि यातील एखादा स्तंभ जरी अडचणीत आला तरी त्यांच्या व्यापाराची इमारत हादरून जाते किंवा कोसळू शकते. यात शेतकऱ्यापेक्षाही अधिक गुंतवणूक करार करणाऱ्या कंपन्यांची अडकलेली असते. म्हणूनच करार शेती ही ग्राहक, उत्पादक आणि एकूण देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. करार शेतीच्या अनुषंगाने सर्वांगीण विचार होणे आवश्यक आहे.
करार शेतीचे यश-अपयश
करार शेतीची पुढील दिशा
: डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६० (लेखक शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.