पूर्वमशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत. पाण्याची सोय असल्यास भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. कापूस
मागील हंगामातील कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावेत. त्यामुळे त्यावर आलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घ्यावेत. पुरेसा ओलावा नसल्यास हलके पाणी देऊन डहाळे उपटून घ्यावेत. शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात. सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. उगवणक्षमता तपासणी करण्याकरिता गोणपाट किंवा वर्तमानपत्राचा कागद वापरावा. एका ओळीमध्ये दीड ते २ सेंमी अंतरावर १० दाणे ठेवावेत. अशा प्रकारे १० ओळींमध्ये एकूण १०० दाणे व्यवस्थित रांगेत ठेवावे. त्यानंतर गोणपाटावर अथवा वर्तमानपत्रावर पाणी टाकून ओले करावेत. ते गोल गुंडाळून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडत राहावे. सहा ते सात दिवसांनंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. जर उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल, तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यांस बीजप्रक्रिया करावी. पूर्वमशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत. पाण्याची सोय असल्यास भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. शेतातील मातीचा नमुना घेऊन त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबातची माहिती घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे. प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे, अशा जमिनीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. सरी, वरंबे व चारी खालील जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास १६ टक्के जास्तीचे क्षेत्र वापरता येते. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून गरजेइतकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही. तसेच जमिनीची धूप होत नाही. या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य होते. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते. तुषार सिंचनानंतर पाऊस पडला तरी पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही.या पद्धतीद्वारे कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर (ठिबक व तुषार सिंचन) पीकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात करावा. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. संपर्क ः ०२४२६-२४३२३९ (प्रमुख समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)