
पिकांसाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केले तरच शाश्वत शेती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन साध्य होण्यास मदत होईल. माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे. कमी होणारे सेंद्रिय पदार्थ तसेच सूक्ष्मजीव आणि गांडुळे यांचा अभाव असल्यास जमीन मृतवत होते. माती परीक्षण केल्याखेरीज तिच्या गुणधर्माविषयी आकलन होत नाही. रासायनिक खतांचा ज्या प्रमाणात वापर होत आहे, त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढत नाही. जमिनीत दिलेली रासायनिक खते पिकांना मिळतीलच असे नाही. काही प्रमाणात अन्नद्रव्ये पीक वापरतात, काही पाण्याबरोबर वाहून जातात, काही जमिनीत निचरा होतात, तर काही नत्रयुक्त खते वाफेत रूपांतर होऊन उडून जातात. त्यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात खतांचा वापर करतात. यामुळे जमिनीत रासायनिक प्रदूषणाला सुरुवात होते. पीक पोषणाचा समतोल बिघडतो. जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन जातींचा पीक पद्धतीत वापर, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज, त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार, सूक्ष्म अन्नद्रव्ये विरहित मुख्य अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर इत्यादी घटकांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची समस्या तयार झाली आहे. यामुळे पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे पर्याय
खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती
जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे
एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
संपर्क ः डॉ. हरिहर कौसडीकर, ९४२३१४२२१० (संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.