
सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या संयंत्रातून ३० टक्क्यांपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन होते. सुधारित बायोगॅस संयंत्राच्या कार्यकुशलतेचे परीक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्रालयातर्फे जैववायू विकासासाठी जैववायू संयंत्राची उभारणी सुरू आहे. यामध्ये विविध आकाराच्या संयंत्रांची उभारणी केली जाते.यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये तरंगते वायुपात्र असलेले (केव्हिआयसी) आणि स्थिर घुमट असलेले (जनता किंवा दीनबंधू) संयंत्र आहे. कौटुंबिक पद्धतीच्या जैववायू संयंत्रामध्ये जनावरांच्या शेणाचा वापर करतात. जनावरांचे शेण व पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण करून संयंत्रात टाकतात. पाचन झालेले शेण संयंत्रामधून मळी म्हणून पाण्याइतक्या पातळ रूपात बाहेर येते. ही मळी ४५ दिवस मोकळ्या खड्ड्यात सुकविली जाते. त्यांनतर खत म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु बऱ्याचशा भागात उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे बरेचसे सयंत्र अकार्यक्षम राहतात. त्यामुळे जैववायू तंत्रज्ञान देशात पाणी टंचाईग्रस्त भागात स्वीकारलेले नाही. स्थिर घुमट असलेले जनता प्रकारच्या कौटुंबिक आकाराच्या बायोगॅस संयंत्राच्या रचनेमध्ये ओले शेण पाचन करण्याबाबतचे संशोधन झाले. सुधारित बायोगॅस संयंत्राच्या कार्यकुशलतेचे परीक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. सुधारित जैववायू संयंत्र
सुधारित संयंत्राचे फायदे
संयंत्राची घ्यावयाची काळजी
संपर्क ः डॉ. सुरेंद्र काळबांडे, ९४०५८८०९७६ (विभाग प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.