
सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना पोषणाचे महत्त्व समजून देताना, पोषकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. वाढत्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाच्या काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अवघड होत चालले आहे. जाता जाता खाता येणाऱ्या बेकरी उत्पादनांना व बिस्किटासारख्या पदार्थांचा वापर वाढला आहे. यातील मैद्यामुळे हे पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. केवळ चविष्ट म्हणजे आरोग्यासाठी चांगले असे होत नाही. अशा स्थितीमध्ये पोषक आणि सुरक्षित आहाराची निर्मिती आणि वापर याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. आपला आहार कसा असावा हे समजून घेऊन कृतीत आणण्याची वेळ आलेली आहे. अन्न हे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जानिर्मिती, कार्यशक्ती अशा अनेक कारणांसाठी उपयोगी असते. आहार पोषणदृष्ट्या समतोल असणे गरजेचे आहे. त्यातून योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, पाणी, जीवनसत्त्व व खनिज द्रव्ये यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व्हायला हवा. कोणत्याही एकाच प्रकारच्या खाद्यपदार्थांतून शरीरासाठी आवश्यक त्या सर्व घटकांची पूर्तता होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे घटक, भाज्या, फळे, मांस, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे योग्य प्रमाण आहारात असेल याची खात्री करावी. शरीर, मेंदू आणि स्नायूंच्या योग्य वाढीसाठी संमिश्र व समतोल आहार घ्यावा. कुटुंब प्रमुखांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेने घरातील लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वांचा आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तशा प्रकारे नियोजन करावे. समतोल आहारासाठी आवश्यक सर्व अन्नगट
इकडे लक्ष द्या...
अन्न तयार करताना...
- शुभांगी वाटाणे, ९४०४० ७५३९७ (गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.