शेतकरी नियोजनः पीक हरभरा

आमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा लागवडीचे नियोजन असते. निंदणी आणि काढणीसाठी मजुरांची अनुपलब्धता ही हरभरा उत्पादकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे उगवणपश्‍चात तणनाशकांवर संशोधन होणे फार गरजेचे आहे.
 प्रफुल्ल सुलताने यांच्या शेतात बहरलेले हरभरा पीक.
प्रफुल्ल सुलताने यांच्या शेतात बहरलेले हरभरा पीक.

आमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा लागवडीचे नियोजन असते. निंदणी आणि काढणीसाठी मजुरांची अनुपलब्धता ही हरभरा उत्पादकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे उगवणपश्‍चात तणनाशकांवर संशोधन होणे फार गरजेचे आहे.  कृषी विद्यापीठांनी यंत्राद्वारे काढणी करता येईल असे वाण विकसित केल्याने काढणीसाठी जास्त अडचण येत नाही. शेतकरीः प्रफुल्ल साहेबराव सुलताने गावः गुंजखेड, ता. लोणार, जि. बुलडाणा एकूण क्षेत्रः ८५ एकर हरभरा क्षेत्रः ४५ एकर मी यंदा ४५ एकरांमध्ये हरभरा लागवड केली आहे. लागवडीसाठी ८ ते ९ जातींची निवड केली आहे. पेरणी साधारण ३ नोव्हेंबरला सुरू करून ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली. पेरणीसाठी घरचे बियाणे वापरले.

  • सध्या पीक जातीपरत्वे फुलोरावस्थेत आहे. कोळपणी, निंदणीची कामे पूर्ण केलेली आहेत. आवश्‍यक तेथे निंदणाचा फेर सुरू आहे.
  • सध्या सिंचनाची दुसरी पाळी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकामध्ये सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पिकाची वाढीची अवस्था, फांद्या फुटण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी सिंचन होईल, याकडे लक्ष द्यावे लागते. मोजकेच पण प्रमाणशीर सिंचन करावे लागते. जास्त पाणी झाल्यास हरभरा पिवळा पडतो. तसेच फुले आणि घाटे धारणा कमी होते. 
  •  यासाठी पिकास योग्य वेळी आणि प्रमाणशीर पाणी मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कृषी पंपाला डिजिटल टायमर बसविले आहे. हे टायमर अगदी कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. या टायमरला सिंचनाच्या वेळेनुसार सेट करून ठेवले जाते. त्यानुसार पंप चालू बंद होतो.
  • हरभरा पिकाला पाणी जास्त झाल्यास ओली मुळकूज आणि गरजेपेक्षा कमी पाणी दिले तर कोरडी मुळकूज आढळून येते. यावर्षी वातावरणात सतत बदल होत आहेत. ढगाळ हवामान, पाऊस यामुळे पीक वाढीवर परिणाम होत आहे. सध्या बुरशीनाशक, कीडनाशक आणि ०ः५२ः३४ या विद्राव्य खतांच्या दुसऱ्या फवारणीचे काम सुरू आहे. या फवारणीमुळे फुलधारणेस मदत होईल. 
  • आमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा लागवडीचे नियोजन असते. निंदणी आणि काढणीसाठी मजुरांची अनुपलब्धता ही हरभरा उत्पादकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे उगवणपश्‍चात तणनाशकांवर संशोधन होणे फार गरजेचे आहे. 
  •  कृषी विद्यापीठांनी यंत्राद्वारे काढणी करता येईल असे वाण विकसित केल्याने काढणीसाठी जास्त अडचण येत नाही. उदा. फुले विक्रम, आरव्हीजी २०४, कणक इत्यादी.
  • पीक उगवणीनंतर माकड, रोही (नीलगाय) हे जंगली प्राणी पिकाचे मोठे नुकसान करतात. दिवसा माकडांकडून आणि रात्री रोही पासून पिकाचे संरक्षण करावे लागते.  त्यामुळे पिकाचे राखण करावी लागते. 
  • आगामी कामकाज 

  • हरभऱ्याचे पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत आल्यावर पिकाची गरज पाहून तिसरे सिंचन केले जाईल.
  • घाटे अळीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्‍यकतेनुसार शेतामध्ये इंग्रजी ‘टी’ (T) आकाराचे पक्षिथांबे लावले जातील.
  • वातावरणातील बदलामुळे पानाच्या कडा करपल्यासारख्या दिसत आहेत. तसेच अळी दिसत आहे. नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी घेतल्या जातील.
  •  पुढील काळात आवश्‍यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारण्या घेतल्या जातील. 
  • - प्रफुल्ल सुलताने,   ९७६४३३९२५१ (शब्दांकन ः गोपाल हागे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com