ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात. ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात.थॉमस जेफरसन यांच्या मते, ‘‘शेती हा आपला सर्वांत शहाणपणाचा व्यवसाय असून, त्यातून अंतिमतः सर्वांत खऱ्या संपत्तीची, नैतिक मूल्यांची आणि आनंदाची निर्माण होत असते.’’ अशा एकमेकांवर अवलंबून असलेल्या शेतीला एकात्मिक जैव प्रणाली किंवा शेती म्हणून ओळखले जाते. सुयोग्य प्रकारे एकात्मिक शेती पद्धतीतून माती, पर्यावरण आणि एकूणच आसमंतावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे विरेचन होत असते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये ती आजवर मुरून गेली होती. मात्र दरडोई शेतीचे क्षेत्र कमी होत असून, भारतातील ८२ टक्के शेतकऱ्यांकडे २.५ एकरांपेक्षाही कमी जमीन राहिली आहे. या स्थितीमध्ये अधिक अन्नाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने १९६० नंतरच्या काळामध्ये हे एकमेकांमध्ये गुंफलेले धागे नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि यांसारख्या विविध कारणांमुळे विरळ होत गेले. या शेतकऱ्यांकडे बियाणे, खते, कीडनाशके अशा निविष्ठांच्या खरेदीसाठी किंवा आवश्यकतेनुसार मजुरी देण्यासाठीही ऐपत राहिलेली नाही. हे केवळ भारतात झाले असे नाही, तर जगाच्या विविध भागांमध्ये हेच परिणाम दिसून येत आहेत. भारतामध्ये एकात्मिक शेतीही काही नवीन नाही. ती पूर्वापार आपल्या जीवनशैलीचा एक भाग होती. आत्यंतिक रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती या दरम्यान एक प्रारूप विकसित करण्याचा पर्यायी प्रयत्न १९४३ च्या सुमारापासून सुरू झाला. मात्र त्याचा योग्य विकास आणि डोळस अंगीकार याकडे दुर्लक्ष झाले.
जागतिक पातळीवरील एकात्मिक शेती अनेक युरोपिय आणि आशियायी देशांमध्ये एकात्मिक शेती पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यातील अनेक पद्धती सद्यःस्थिती आणि भविष्यात येऊ घातलेल्या हवामान बदलाच्या संकटामध्ये अधिक लोकसंख्येसाठी अन्नधान्य उत्पादनाच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी पशुपालनाची सांगड शेतीशी घातली आहे. त्यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये शाश्वत वाढ झाली आहे. सामान्यतः एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानंतर दोन ते तीन वर्षांमध्ये मातीची सुपीकता वाढून उत्पादनामध्ये वाढीला सुरुवात होते. त्याची बाजारपेठेशी सांगड घातल्यास कुटुंबाच्या उत्पन्नांमध्ये वाढ होते. पोषकतेची गरज चांगल्या प्रकारे भागू शकते. एकात्मिक शेतीची वैशिष्ट्ये
संकल्पना
ओडिशामध्ये भात शेती फुलोऱ्यात असताना आलेल्या फॅलीन वादळाने पिकांचे नुकसान झाले तरी कुटुंबाला दुग्ध व्यवसाय, ताग, मत्स्यपालन यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने वर्षभर तग धरणे शक्य झाले. त्या वेळी जे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून होते, त्यांच्या आर्थिक क्षमता शून्यावर आल्या होत्या. एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रारूपानुसार २० ते ३० टक्क्यांनी उत्पन्न वाढत असल्याचे पुढे आले आहे. संपर्क- वाणी एन., ०९४८०८३६८०५ (लेखिका एसबीआय- आर बी, हैदराबाद येथे संशोधन व्यवस्थापक आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.