विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त ः मुख्यमंत्री

विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त ः मुख्यमंत्री
विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त ः मुख्यमंत्री

मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण करून महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १८) सह्याद्री राज्य अतिथीगृहात केली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य हागणदारीमुक्त होणार होते. मात्र, पाणीपुरवठा स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाने अत्यंत चांगले काम केल्याने विक्रमी वेळेत हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये एका वर्षात दोन लाख, यवतमाळमध्ये शेवटच्या सहा महिन्यात दीड लाख तर गडचिरोलीत ५४ हजार शौचालयांचे काम करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध झाल्याने राज्याला हागणदारीमुक्त करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात असलेल्या शौचालयांचा वापर कारण्यासंदर्भात देशपातळीवर विविध उपक्रम आणि जाहिराती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षात २२ लाख ५१ हजार ८१ शौचालयांची निर्मिती करण्यात आली तर २ लाख ८१ हजार २९२ सामूहिक अथवा सार्वजनिक शौचालयांचे काम झाले. गेल्या ६५ वर्षात राज्यात फक्त ४५ टक्के शौचालयांची निर्मिती झाली तर युती शासनाच्या काळात ५५ टक्क्यांवर शौचालयांची बांधकामे झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com