मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने शेतकऱ्याला दिलासा; प्रलंबित मागणी पूर्ण

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या व्यग्र दैनंदिनीत एका शेतकऱ्याच्या व्यथेची दखल घेतली होती. व्यथित होऊन जीवन संपविण्याच्या तयारीने मुंबईत दाखल झालेले नांदेड जिल्ह्यातील धनाजी जाधव मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या शब्दांमुळे नवी उमेद घेऊन परतले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आत्मीयतेने दखल घेतलेल्या या शेतकऱ्याची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

जमिनीवरील कर्ज नोंदीमुळे फेरफार न झाल्याने श्री. जाधव यांचा मोठा व्यवहार अडला होता. त्यावर त्यांनी मुंबईत येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली. श्री. जाधव यांनी आपल्या जमिनीचा व्यवहार आणि कर्जाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेने शेतकऱ्याची स्थिती जाणून घेतली. श्री. जाधव यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वस्त केले. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणा आणि महसूल अधिकारी यांना निर्देश दिले.त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणेसह श्री. जाधव व संबंधित बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. श्री. जाधव यांच्या प्रकरणातील वस्तुनिष्ठता तपासून जमीन विक्री प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे निर्देश दिले. यामुळे श्री. जाधव यांना कर्ज फेडीसह शेतीकामांचा मार्ग मोकळा झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com