परीक्षांच्या नियोजनासाठी समिती स्थापन ः मंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यासर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई  : राज्यातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यासर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

राज्यातील कृषीवगळता सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी मंत्री सामंत यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. यासर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

ही समिती राज्यातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव, स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक, नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठात मल्टीपर्पज लॅब सुरु करण्याबाबत सूचना राज्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारांसंदर्भातील चाचण्या घेता येतील, अशा स्वरुपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरु करण्याच्या सूचनाही श्री.सामंत यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (नांदेड) अशा प्रकारची लॅब सुरु केली आहे. यासाठी केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील, याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठांनी विचार करावा, अशा सूचनाही मंत्री सामंत यांनी कुलगुरूंना केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com