खरिपात पीककर्ज वाटपाचे चार हजार कोटींचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील बॅंकांकडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यंदा बॅंकेने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात चार लाख १० हजार ७२ शेतकऱ्यांना तब्बल ३ हजार ९९९ कोटी ९८ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

पुणे ः ‘‘जिल्ह्यातील बॅंकांकडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यंदा बॅंकेने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात चार लाख १० हजार ७२ शेतकऱ्यांना तब्बल ३ हजार ९९९ कोटी ९८ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या सव्वा महिन्यात खरिपात जिल्ह्यातील एक लाख २० हजार ७२१ सभासद शेतकऱ्यांना एक हजार ४७ कोटी ५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे’’, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे (बँक ऑफ महाराष्ट्र) मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

बदलते हवामान, शेतीमालाला कमी दर, अवकाळी पाऊस अशा विविध कारणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहेत. त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज दिले आहे.

यंदा जिल्हा बँकेने तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला आहे. बँकेकडून पाच लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ११ टक्के दराने वाटप करत आहेत.

खरीप, रब्बी बॅंकनिहाय पीककर्जाचे उद्दिष्ट :

बॅंक--- शेतकरी संख्या --- पीककर्जाचे उद्दिष्ट (रुपये कोटींत)

पुणे जिल्हा बॅंक ---३,२७,९९० ---२४००.००

राष्ट्रीयीकृत बॅंका --- ६३,६०७ --- १०३८.४१

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक --- ३६४ --- ५.००

खासगी बॅंका --- १८.१११ --- ५५६.५७

एकूण --- ४,१०,०७२ --- ३९९९.९८

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही विशेष मोहीम २४ एप्रिलपासून राबविण्यात येत आहे. त्याचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. - श्रीकांत कारेगावकर, मुख्य व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, पुणे
- श्रीकांत कारेगावकर, मुख्य व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com