
प्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी नसावे आणि पंधरापेक्षा जास्त नसावे. संचालक मंडळाने विपणन समिती, संपादन समिती, लेखा समितीची निर्मिती करून प्रत्येक समितीला कामकाजाचे वाटप करणे अपेक्षित आहे.
शेतकरी कंपनीसाठी संचालक मंडळातील संचालक निवड अत्यंत महत्त्वाची असते. अन्यथा, वेळ व पैसा या गोष्टी वाया जाऊन विनाकारण मनस्ताप होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असे निदर्शनास आले आहे, की सुरुवातीला एक शेतकरी कंपनी नोंदणी झाल्यानंतर त्यात एक किंवा दोन संचालक चांगल्या पद्धतीने कामकाज करतात. परंतु एक वेळ अशी येते की इतर संचालकांच्या नाकर्तेपणामुळे काम करणारे संचालक कंपनीतून बाहेर पडतात व दुसरी शेतकरी कंपनी स्थापन करून कामकाज सुरू करतात. पुन्हा पहिल्या कंपनीतून काही संचालक बाहेर पडून नवीन कंपनी नोंदणी करून कामकाज सुरू करतात. यामुळे हातात काही न येता पैशांचे व वेळेचे नुकसान होऊन कोणालाही काहीही प्राप्त होत नाही.
संचालक मंडळाचे कामकाज
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन तज्ज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.