
जिवती, चंद्रपूर : तलाठ्याच्या चुकीचा फटका सहा गावांतील ११० शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची (Farmer Compensation) रक्कम दुसऱ्यांच्या खात्यांत जमा झाली. ज्यांच्या खात्यांत पैसे जमा झाले त्यांनी बॅंकेतून काढून घेतले. त्यामुळे आता बॅंक आणि पीडित शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्यातील वणी खुर्द साजातील ही सहा गावे आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी तलाठ्याने दुसऱ्याच शेतकऱ्यांचे खाते क्रमांक दिले. विशेष म्हणजे, ५२ शेतकऱ्यांचे पैसे एकाच खात्यात जमा झाले. काही शेतकऱ्यांचे पैसे इतरांच्या खात्यांत जमा झाले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मजुरांना मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
तत्कालीन तहसीलदार आणि तलाठ्याने हा घोळ केला, असे विद्यमान तहसीलदार प्रवीण चिडे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर चुकीने पैसे जमा झाले त्यांनी ते बॅंकेतून काढले. त्यामुळे ज्यांच्या नावाने नुकसानभरपाई आली त्यांना ती आता मिळणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.