
वडापुरी, ता. इंदापूर ः शेतकऱ्यांनी कमी खर्चात व कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या कडधान्य पिकांकडे (Pulses Crop) वळावे, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी केले आहे. रेडणी (ता. इंदापूर) येथील ठवरेवस्ती येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतीशाळेचे तसेच कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
तूर, सोयाबीनसांरख्या पिकांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. या पिकांमधील कीड-रोग नियंत्रण योग्य वेळेस केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच खरीप पिकांची पेरणी करताना बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले. तर कृषी विभागातील विविध योजनांची माहिती या वेळी देण्यात दिली.
कृषी सहायक महेश वाघ यांनी शेतीशाळेत तूर पिकाचे तंत्रज्ञान, विविध वाण, तूर पिकातील आंतरपिकांचे नियोजन, तसेच तूर, बाजरी, मका इत्यादी पिकांची बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बीज प्रक्रियेचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक रामदास शिंगटे, दादासो तरंगे, नाना शिंदे, महादेव काळंगे, विलास गलांडे, अंकुश गलांडे, समाधान शिंदेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.