नगरः खरिपातील (Kharip Crops) पिकांत बाजरी, कापूस, मका पेरणीत बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे. मात्र मूग, उडीद, तूर, सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांच्या पेरणी बियाणे बदलाचे प्रमाण अल्पच आहे. बियाणे बदलाचे प्रमाणानुसारच कृषी विभागाकडून बियाणे मागणीचे नियोजन केले आहे.
खरिपात मूग, उडीद, तूर, सोयाबीन बाजरी, कापूस, मका, भात ही प्रमुख पिके आहेत. त्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर यांचे क्षेत्र अधिक असते. खरिपात अथवा रब्बीत पेरणी करताना शेतकऱ्यांनी संशोधित वाणांची पेरणी करून उत्पादन वाढ करावी, असे सरकारी पातळीवर प्रयत्न करत सुरू आहेत. कृषी विद्यापीठांनी त्यासाठी विविध सुधारित वाण संशोधित केलेले आहेत. पेरणी करताना बियाणे बदलाचे प्रमाण वाढणे अपेक्षित असते. मात्र बियाणे बदलांत फारशी वाढ होत नसल्याचे दिसत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ बाजरी, कापूस, मका या तीन पिकांचेच बियाणे बदलाचे प्रमाण शंभर टक्के आहे.
कृषी विभागाकडून बियाणे बदलाचे प्रमाण वाढावे यासाठी जागृती होणे गरजेचे असताना नगर जिल्ह्यात मात्र याबाबत जागृती होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून बियाणे बदलात फारसा फरक झाल्याचे दिसत नाही. नव्या बियाण्यांची पेरणी करण्याऐवजी जुन्याच पारंपरिक बियाण्यांची पेरणी करण्याकडे अधिक कल असल्याचे दिसत आहे. बियाणे बदलाच्या प्रमाणानुसारच सहा लाख ५० हजार ४४० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरून ७० हजार क्विंटलची मागणी केली आहे.
नगर जिल्हा बियाणे बदलाचे प्रमाण (टक्के)
भातः २२, बाजरीः १००, कापूसः १००, मकाः १००, तूरः १३, मुगः १०, उडीदः ३०, भुईमूगः ३, तीळः ७९, सूर्यफूलः ७७, सोयाबीनः २३.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.