भारत श्रीलंकेला पुरवणार २ लाख टन इंधन

श्रीलंकेत निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक पेचप्रसंगात भारताने आतापर्यंत मोठी मदत केली आहे.
Fuel Supply
Fuel Supply Agrowon

नवी दिल्ली : श्रीलंकेत निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक पेचप्रसंगात भारताने आतापर्यंत मोठी मदत केली आहे. आता भारताने इंधन पुरवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भारताकडून श्रीलंकेला सुमारे २ लाख टनांहून अधिक इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याची घोषणा केली.

भारताकडून गुरुवारी श्रीलंकेला ६५ हजार टन युरियाचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनी खते विभागाचे सचिव राजेशकुमार चतुर्वेदी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर खते पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. पण इतर सर्व गोष्टींसाठी त्यांना आयातीवर अवलंबून रहावे लागते. सध्या श्रीलंकेवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परदेशी गंगाजळी संपली आहे. त्यामुळे त्यांना खाद्य पदार्थांपासून इंधन आणि इतर सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेजारील या देशाला हवी ती मदत देण्याची घोषणा भारताने केली आहे.

भारताने आजवर श्रीलंकेला तांदळाची खेप पाठवली आहे. तसेच १८.५ हजार कोटी रुपयांची मदतही केली आहे. श्रीलंकेच्या पायाभूत सुविधा योजनांमध्येही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com