Pakistan Chilli production : पाकिस्तानचं मिरची हब संकटात

जगातील चौथ्या क्रमांकावरील पाकिस्तानमध्ये यंदा मिरची उत्पादनात मोठी घट झाली.
Pakistan Chilli production
Pakistan Chilli productionAgrowon

पुणेः जगातील चौथ्या क्रमांकावरील पाकिस्तानमध्ये यंदा मिरची उत्पादनात (Chilli Production) मोठी घट झाली. पाकिस्तानमधील मिरची उत्पादक भागांना यंदा अतिउष्णता आणि पुराचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन निम्म्यापर्यंत घटल्याचं येथील व्यापारी आणि शेतकरी सांगित आहेत.

पाकिस्तानमधील कापूस पिकाला (Cotton Crop) पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला. कापसासोबतच पूर आणि उष्णतेचा फटका पाकिस्तानमधील मिरची पिकालाही बसला. पाकिस्तान मिरची उत्पादनात चौथ्या क्रमांकावर येतो. येथे दरवर्षी जवळपास दीड लाख एकरवर मिरचीची लागवड होते. तर उत्पादनही जवळपास दीड लाख टनांवर होते. त्यामुळे जागतिक मिरची बाजारात पाकिस्तानचं स्थान महत्वाचं आहे.

पाकिस्तानमध्ये यंदाचं वर्ष मिरची उत्पादकांची परिक्षा पाहणारं ठरलं. पाकिस्तानमध्ये उन्हाळ्यात यंदा अनेक वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. उष्णता जास्त असल्याने मिरची लागवडीवर परिणाम झाला. तर झालेल्या लागवडीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी टाकलेल्या रोपवाटीका उष्णतेमुळे करपल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोपांची धावाधव करावी लागली. याचा फटका मिरची लागवडीला बसला. त्यामुळे यंदा पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी मिरची लागवड झाल्याचे येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात उष्णतेचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुराचा सामना करावा लागला. पाकिस्तानमधील पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांशी भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे कापूस, भाजीपाला आणि मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकाच वर्षात तापमानात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने यंदा पाकिस्तानमधील मिरची उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

Pakistan Chilli production
Crop Insurance : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत

पाकिस्तानमधील अनेक मिरची उत्पादकांना यंदा निम्मही उत्पादन मिळालं नाही. अनेक शेतकरी केवळ ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच उत्पादन मिळाल्याचं सांगत आहेत. पाकिस्तानमध्ये कुनरी मिरची मार्केट सर्वात मोठे आहे. या बाजारात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात असते. कुनरी बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते गेल्यावर्षी या काळात १० हजार बॅग्सपर्यंत मिरीच आवक होत होती. मात्र सध्या आवक २ हजार बॅग्सपेक्षा जास्त होतना दिसत नाही.

मिरीच उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आवक घटल्याने दरातही वाढ झाली. मात्र या दरातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणारे नाही, असेही पाकिस्तानमधील काही शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com