Tur Procurement: हमीभावाने तूर खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

सध्या बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे सरकारने हमीभावाने खरेदी सुरु केली. परंतु नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावरही राज्यात आत्तापर्यंत केवळ १२६० टन तूर खेरदी झाली.
Tur
Tur

पुणेः सध्या बाजारात तुरीचे (Tur) दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे सरकारने हमीभावाने खरेदी (Procurment) सुरु केली. परंतु नाफेडच्या (NAFED) हमीभाव खरेदी केंद्रावरही राज्यात आत्तापर्यंत केवळ १२६० टन तूर खेरदी झाली. याचाच अर्थ असा की, शेतकरी हमीभावानेही (MSP) तूर विकत नाहीत. कर्नाटकात आत्तापर्यंत सर्वाधिक तूर खरेदी झाली.  देशात खरिपात ३८ लाख हेक्टरवर तूर लागवड झाली होती. पहिल्या अंदाजात सरकारने यंदा ४४ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अतिवृष्टी आणि पुराने तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तूर पिकाचं ३० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचं सांगितलं. त्यामुळे उत्पादन कमी राहील असे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. हे ही वाचाः युरिया उत्पादन वाढीसाठी सरकारचा पुढाकार उत्पादनाचा अंदाज कमी होत गेला. आता सरकारने सुधारित अंदाज ४० लाख टनांचा जाहिर केला. मात्र प्रक्रिया उद्योगाने उत्पादन यापेक्षाही कमी राहिल, असं म्हटलंय. बाजारातील जाणकारांच्या मते उत्पादन ३० ते ३२ लाख टन राहिल. तर प्रक्रिया उद्योगाच्या मते ३३ ते ३४ लाख टन तूर हाती येईल. सरकार आणि उद्योगाच्या अंदाजात तफावत आहे. मात्र यंदा उत्पादन घटलं हे नक्की. देशात उत्पादन घटल्यानंतर त्या पिकाचा भाव वाढतो. कापसाच्या बाबतीत यंदा हा अनुभव आला. मात्र सरकारने तुरीची मोठ्या प्रमाणात आयात केली. कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहेत. त्यामुळे कापूस आयात शक्य नाही. त्यातच सरकराने कापूस आयातीवर १० टक्के शुल्क लावलेले आहे. मात्र कडधान्याची आयात मुक्त आहे. तसेच कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे देशात आतापर्यंत तब्बल ६ लाख टनांच्या दरम्यान आयात झाली. हे ही वाचाः देशात सोयातेल आयात वाढली यंदा माल टप्प्याटप्याने विकल्यानंतर चांगला दर मिळाला, असा अनुभव आहे. कापूस आणि सोयाबीनला यामुळे चांगला दर मिळाला. त्यामुळे माल रोखून धरल्यास तुरीचेही दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबविली, असे जाणकारांनी सांगितले.

बाजारातील दर मात्र कडधान्याची आयात मुक्त आहे. तसेच कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे देशात आतापर्यंत तब्बल ६ लाख टनांच्या दरम्यान आयात झाली. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दर दबावत आहे. सध्या बाजार दर हमीभाव ६ हजार ३०० रुपयांपेक्षाही कमी आहेत. सध्या बाजारात तुरीला सरासरी ५ हजार ९०० ते ६ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.

राज्यनिहाय तूर खरेदी बाजारात दर हमीभापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावाने तूर विकतील, असा अंदाज होता. मात्र महाराष्ट्रात हमीभावाने तूर विक्रीला कमी प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ १२६० टन तूर हमीभावाने विकली गेली. तर देशात १८ हजार २२९ टन तुरीची नाफेडने खेरदी केली, असे नाफेडच्या आकडेवारीवरून कळते. देशात सर्वाधिक तूर कर्नाटकात खरेदी झाली. येथे नाफेडला शेतकऱ्यांनी १२ हजार ७४८ टन माल विकला. त्यानंतर गुजरातमध्ये चार हजार टन आणि तमिळनाडूत सर्वांत कमी २९ टन तूर शेतकऱ्यांनी नाफेडला विकली. तूर उत्पादनात कर्नाटक अग्रेसर आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com