Edible Oil : खाद्यतेलात स्वयंपूर्णतेसाठी नारळ-भुईमुगाची निर्यात रोखा

देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्याचे मोठे आव्हान सध्या सरकारसमोर आहे. सद्यःस्थितीत तेलवर्गीय पिकांच्या उत्पादनातून केवळ ३० टक्‍केच खाद्यतेलाची गरज भागते.
Edible Oil
Edible OilAgrowon

नागपूर ः केंद्र सरकारने नारळ (Coconut Export) आणि भुईमूग (Groundnut Export) निर्यात थांबविल्यास देशांतर्गत तेलबियावर्गीय पिकांच्या उत्पादनात (Domestic Oil Seed Production) वाढ होत त्यातून खाद्यतेल उत्पादकताही (Edible Oil Yield) वाढेल, असा दावा एडिबल ऑईल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ इंडिया (भारतीय खाद्यतेल व्यापार संघटना) कडून करण्यात आला आहे. त्यासोबतच देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या तेलवर्गीय पिकांच्या व्यवस्थापन पद्धतीत बदल केल्यास तेलबियावर्गीय पिकांची उत्पादकता ८० टक्क्यांपर्यंत नेणे शक्‍य होणार आहे. त्याकरिता संशोधक संस्थांची मदत केंद्र सरकारने घ्यावी, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे.

Edible Oil
Edible Oil : खाद्यतेल आयातीवर शुल्क लावा; सोपाची मागणी

देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्याचे मोठे आव्हान सध्या सरकारसमोर आहे. सद्यःस्थितीत तेलवर्गीय पिकांच्या उत्पादनातून केवळ ३० टक्‍केच खाद्यतेलाची गरज भागते. उर्वरित ७० टक्‍के खाद्यतेलाची आयात करावी लागत असल्याने त्यावर मोठे परकीय चलन खर्ची जाते. देशात तेल उत्पादनाच्या बाबतीत अशी विरोधाभासी स्थिती असतानाच केंद्र सरकारकडून तेलवर्गीय पिकात मोडणाऱ्या नारळ व भुईमुगाची निर्यात केली जात आहे. तब्बल ५० टक्क्यांपर्यंत या दोन्ही तेलवर्गीय शेतीमालाची निर्यात होत आहे. त्याच कारणामुळे देशाला ७० टक्क्यांपर्यंत खाद्यतेलाची आयात करावी लागत असून त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. नारळ आणि भुईमुगाची निर्यात रोखल्यास देशाच्या तेल उत्पादनात वाढ होण्यास हातभार लागून देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे नारळ आणि भुईमुगाची निर्यात थांबवावी, अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, भारत सरकारने तेलबियावर्गीय पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहे. परंतु यातून फार काही साध्य होईल, अशी असोसिएशनला अपेक्षा नाही. त्यामागील कारणांचा खुलासा करताना असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्‍कर यांनी सांगितले, की ११ हजार कोटी रुपये केवळ पामतेल उत्पादनासाठी आरक्षित करण्यात आले आहेत; मात्र त्याचवेळी इंडियन ऑईल मिशनसाठी केवळ सहा हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे नेणारा निश्‍चितच नाही, असाही दावा करण्यात आला आहे.

सरकारला खरोखरच देश खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर करायचा असेल तर देशांतर्गत घेतल्या जाणाऱ्या भुईमूग, मोहरी, सरकी, नारळ यासारख्या तेलबियावर्गीय शेतमालाच्या संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागणार आहे. देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा हाच एक दूरगामी पर्याय ठरणार आहे.
शंकर ठक्‍कर, अध्यक्ष, एडिबल ऑईल असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com