कांदा काढणी खर्च ३० टक्क्यांनी वाढला

सध्या तापमानात कमालीची वाढ झाल्याने कांद्याची पात लवकर सुकून जात आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कांदा काढणीची लगीनघाई आहे.
onion
onionagrowon

नाशिक : चालूवर्षी उन्हाळ कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्यानंतर कांदा पोसण्याच्या अवस्थेत मार्च महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या कांदा लागवडी एकसोबतच काढणीसाठी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा काढणीसाठी मजुरांची तुलनेत उपलब्धता कमी आहे. परिणामी चालूवर्षी कांदा काढणीचे एकरी दर सरासरी ३० टक्क्यांनी वाढल्याची स्थिती आहे. ९ हजारांपासून ते ११ हजार रुपयांपर्यंत कांदा काढणी करावी लागत आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे.

बियाणे, लागवड, खते, कीटकनाशके, मजुरी आदी बाबींवर गेल्या दोन वर्षांत खर्चात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यांचे गणित पूर्णतः व्यस्त आहे. असे असले तरी खर्च थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सध्या मजूर टंचाई असल्याने जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. गेल्या चार वर्षात एकरी ४.५ हजार काढणी खर्च वाढला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत चालूवर्षी ३ हजारांनी वाढ झाली आहे. तर काढणी करून कापणी झालेला कांदा निवडून चाळीत भरण्यासाठी ट्रॉलीमागे २०० रुपयांनी म्हणजेच ९०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

सध्या तापमानात कमालीची वाढ झाल्याने कांद्याची पात लवकर सुकून जात आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कांदा काढणीची लगीनघाई आहे. मात्र, मजूर उपलब्ध होत नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे कांदा काढणी १५ दिवस लांबणीवर गेली आहे. तर उन्हाच्या चटक्यामुळे कांद्याच्या प्रतवारीत घसरण होत आहे.

काढणी खर्चात वाढ होण्यामागील कारणे

  • चालू वर्षी सरासरी लागवडी क्षेत्राच्या तुलनेत वाढ

  • लागवडी लांबल्याने काढणी लांबणीवर

  • ४० अंश सेल्सिअसवर तापमान वाढल्याने मजुरांचा कल कमी; उष्णतेमुळे कामाची गती मंदावली

  • मजूर टंचाईमुळे एकरी काढणीची मजुरीत वाढीव बोली

  • रोजंदारी ऐवजी थेट एकरी मक्ता पद्धतीने काढणीवर मजूर ठाम

  • स्थानिक मजूर उपलब्धता कमी असल्याने परप्रांतीय मजुरांकडून कामकाजलागवडी वाढल्या असल्या तरी एकरी उत्पादन ४० टक्क्यांवर घटले आहे. आता कांदा काढणी वेळेवर होण्यासाठी मजुरांच्या विनवण्या कराव्या करून अधिक पैसे मोजावे लागत आहे. मात्र कांद्याला दरच नसल्याने अडचणींचा डोंगर उभा आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून रास्त भाव देण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी ठोस धोरणावर काम करावे.

लागवडी वाढल्या असल्या तरी एकरी उत्पादन ४० टक्क्यांवर घटले आहे. आता कांदा काढणी वेळेवर होण्यासाठी मजुरांच्या विनवण्या कराव्या करून अधिक पैसे मोजावे लागत आहे. मात्र कांद्याला दरच नसल्याने अडचणींचा डोंगर उभा आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून रास्त भाव देण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी ठोस धोरणावर काम करावे.

संदीप कोकाटे, कांदा उत्पादक शेतकरी, साताळी, ता. येवला

स्थानिक मजूर कमी प्रमाणावर उपलब्ध असल्या कारणाने अधिक दराची बोली करून काढणीसाठी राजी होत आहेत. शेतकरी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत कामाचे नियोजन करत आहे. जसा उत्पादन खर्च वाढतोय तसा भाव मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन दिलासा द्यावा.

- किरण मोरे, कांदा उत्पादक, ठेंगोडा, ता. सटाणा

चालू वर्षी उत्पादन खर्चासह काढणी खर्चात भरमसाट वाढ झाली. उत्पादन घटल्याने अजूनच कोंडी झाली आहे. त्यामुळे पुढे काय माहीत नाही, मात्र आता मजुरीवर वाढीव पैसे मोजावे लागत आहे.

- संदीप मगर, कांदा उत्पादक, वाखारी, ता. देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com