
Kolhapur News राज्यातील यंदाचा साखर हंगाम (Sugar Season) जवळजवळ संपल्यात जमा आहे. १४ एप्रिल अखेर राज्यात केवळ तीन साखर कारखाने सुरू आहेत. जादा साखर उत्पादनाचे अंदाज पूर्णतः: कोलमडले आहेत.
केवळ १०४ लाख टन साखरेची निर्मिती (Sugar Production) झाली आहे. सद्यःस्थिती पाहता १०५ लाख टनांवर साखर निर्मिती होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या पंधरा दिवसांत तर साखर निर्मिती अतिशय हळू झाली आहे.
पंधरा एप्रिलनंतर एखादा- दुसरा कारखाना सुरू राहील, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ ४० साखर कारखाने बंद झाले होते. यंदा बंद झालेल्या कारखान्यांची संख्या २०४ वर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी दैनंदिन गाळप क्षमता ८ लाख २८ हजार ६५० टन प्रतिदिन इतकी होती. यंदा यात वाढ होत गाळप क्षमता ८ लाख ८४ हजार ९५० टन प्रति दिन इतकी झाली. याचाही परिणाम जलद गाळपावर झाला. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक गतीने गाळप झाले.
दहा ते पंधरा टक्केपर्यंत ऊस उत्पादनात घट
यंदा १५ मार्च नंतर बहुतांशी कारखाने बंद होण्यास प्रारंभ झाला. यंदा २१० साखर कारखान्यांनी साखर हंगाम सुरू केला होता. १४ एप्रिलअखेर २०७ कारखान्यांनी साखर हंगाम बंद केला आहे.
उसाच्या उत्पादनात झालेली घट ही हंगाम लवकर संपविण्यास कारणीभूत ठरली आहे. यंदा सरासरी दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाच्या उत्पादनात घट आली आहे.
याचा साहजिकच परिणाम कारखान्यांच्या गाळप क्षमतेवरही झाला. शेवटच्या पंधरा दिवसांत केवळ एक लाख टन साखरेची निर्मिती झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.