आरबीआयने रेपो रेटमध्ये केली वाढ

देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आरबीआयने रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनाची महामारी यांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
RBI
RBI Agrowon

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास (Shashikant Das) यांनी ही माहिती दिली. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉईन्टची वाढ केल्यामुळे तो ४.५० टक्क्यांवरून ४.९० टक्क्यांवर गेला आहे. या निर्णयाचा फटका कर्जदारांना बसणार आहे. रेपो रेट वाढवल्यामुळे कर्जे महागणार असून कर्जाच्या हप्त्यांमध्येही (ईएमआय) वाढ होणार आहे.

देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आरबीआयने रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनाची महामारी यांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

देशात महगाईचा भडका उडाला आहे. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी आरबीआयने महिन्याभरात दुसऱ्यांदा रेपो रेट वाढवला आहे. यापूर्वी चार मे रोजी रेपो रेट मध्ये अचानक ४० बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती.

रेपो रेट वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ बसणार आहे.आरबीआय देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून जास्त व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना जास्त व्याजदर आकारतात. त्यामुळे पैशांचा पुरवठा घटतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com