आधी वीज बिले दुरुस्त करा, मगच वसूली करा : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

उर्जामंत्रीडॉ. नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात कृषि पंप विज पुरवठ्याचा मुद्दा चिघळण्याची चिन्हे आहेत. तर आतामहाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राज्य सरकारपुढे मागण्या ठेवल्या आहेत. यात कृषि पंप धारकांसाठी काय मागण्या आहेत, वाचा सविस्तर.
Vij bill mafi
Vij bill mafi

पुणे : महावितरण कंपनीने राज्यातील शेती पंप वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती त्वरीत बंद करण्याची मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. याखेरिज संघटनेने राज्य शासनापुढे काही मागण्या मांडल्या आहेत. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागतील, असे म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या वादाची चिन्हे दिसत आहेत.

“वीज देयकाची रक्कम जे ग्राहक भरणार नाही, अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल. तसेच थकबाकीदार ग्राहकांना कोणतीही सवलत देणार नाही,”

- डॉ. नितीन राऊत, उर्जामंत्री, महाराष्ट्र शासन

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका शेतकऱ्याची नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी ह्रदयद्रावक आहे. 2016 मध्ये पैसे भरून आजअखेर जोडणी नाही. 2019 पासून वीज बिले येत आहेत. कळस म्हणजे आता नसलेल्या जोडणीची मागील सर्व पोकळ व खोटी थकबाकी भरा, त्यानंतर प्रत्यक्ष जोडणी देण्यात येईल असे विचित्र व तुघलकी फर्मान अधिकाऱ्यांनी काढले असल्याचे संघटनेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

“राज्यातील बहुतांशी शेती पंप वीज ग्राहकांची वीज बिले व थकबाकी दुप्पट फुगविलेली आणि बोगस असल्याने प्रथम वीज बिले दुरुस्त करा. नंतरच सवलत योजनेच्या अंतर्गत लाभ देऊन वसूली करा,”

- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

राज्यात कित्येक ठिकाणी वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. असे शेती पंप वीज ग्राहक राज्यात अंदाजे पाच टक्के म्हणजे अंदाजे दोन लाख वा अधिक असण्याची शक्यता आहे. वीज बिले व थकबाकी जादा आहे, अशा शेती पंप वीज ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

महावितरण कंपनीने ५०% ग्राहक सवलत योजनेत सहभागी झाले आहेत अशी प्रसिद्धी सुरु केली आहे. प्रत्यक्षात महावितरणच्या वेबसाईटवरील माहितीनुसार जमा रक्कम फक्त १० टक्क्यांच्या आत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेच्या मागण्या :

  • आम्ही बिले दुरुस्त करा म्हणत आहोत. कमी करा म्हणत नाही. बिले दुरुस्तीमुळे कंपनीचे वा सरकारचे कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही, मात्र ग्राहकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. या मागण्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत हे ध्यानी घेऊन महावितरण कंपनीने त्वरित वरीलप्रमाणे निर्णय घ्यावेत असे आवाहन शेवटी प्रताप होगाडे यांनी केले आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com