मुंबई : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी, २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
२२ आणि २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौद्धवाडी, मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) ही गावे बाधित झाली होती. या दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरत होती. तळीये गावातील बहुतांश घरे उद्ध्वस्त झाली होती. तर अनेकजण गाडले गेले होते. त्यामुळे या गावातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या गावांमध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी १३ कोटी, २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
अशा प्रकारे झाला निधी मंजूर.. तळीये, कोंडाळकरवाडी व बौद्धवाडीमध्ये भूसंपादन करण्यासाठी २ कोटी, ९२ लाख रुपये, केवनाळे मध्ये भूसंपादन करण्यासाठी ६४ लाख रुपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख रुपये असे एकूण भूसंपादनासाठी ३ कोटी, ९४ लाख रुपये तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर कोंडाळकरवाडी व बौद्धवाडीमध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी ९ कोटी ३० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा८ फेब्रुवारी, २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.