पारोळा, जि. जळगाव : यंदा जलसाठा मुबलक आहे. बोरी मध्यम प्रकल्पातून कालव्याद्वारे सिंचनासाठी तीन आवर्तन देण्यात येणार असून, यामुळे रब्बी हंगाम जोमात साधता येईल, अशी अपेक्षा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पारोळा येथे ही बैठक झाली. बैठकीस आमदार चिमणराव पाटील, उपविभागीय अभियंता एस. ओ. पवार, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, शाखा अधिकारी अजिंक्य पाटील, कालवा सल्लागार समिती सदस्य रेखा सतीश पाटील यांचे प्रतिनिधी डी. के. पाटील, कालवा निरीक्षक नाना पाटील, शशिकांत ठाकरे, रमेश पाटील व पाटबंधारे कर्मचारी तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
या वर्षी रब्बी हंगामासाठी बोरी प्रकल्पातून कालव्याद्वारे सिंचनासाठी तीन आवर्तन देण्यात यावीत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कलव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन देण्यात यावे, याप्रमाणे बोरी प्रकल्पातून कालव्याने सिंचनासाठी तीन आवर्तने व पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन देण्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. बोरी मध्यम प्रकल्पाचा रब्बी हंगाम २०२१-२२ व उन्हाळी बिगरसिंचन कालव्याद्वारे पाणी देण्याबाबत डी. पी. अग्रवाल, कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या उपस्थितीत निर्णय होऊन मान्यता देण्यात आली. तसेच सर्व शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरून सिंचन पाणीपट्टी भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.