‘गंगापूर’मधून २ हजार क्युसेकचा  विसर्ग सुरू

नाशिक : गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या धरणातून गुरुवार (ता. २९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. दुपारी २ वाजता हा विसर्ग २ हजार क्यूसेक इतका सोडण्यात आला.
2 thousand Cusec's discharge continues from ‘Gangapur’
2 thousand Cusec's discharge continues from ‘Gangapur’

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या धरणातून गुरुवार (ता. २९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. दुपारी २ वाजता हा विसर्ग २ हजार क्यूसेक इतका सोडण्यात आला. तर दुपारनंतर त्यात हळूहळू वाढ करण्यात आली आहे. 

सकाळी १० वाजता ५०० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत ३ हजार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नदी किनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाची हजेरी कायम आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली धरण भरल्यानंतर वालदेवी धरणही तुडुंब झाले आहे.

दारणा धरणातून ५५४० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला. भावली धरणातून ४६१, वालदेवी म्हणून ६२, तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २६२३ इतका विसर्ग  सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com