
परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना अनुदान वितरित करण्यासाठी ४५ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राप्त निधी संबंधित तालुक्यांना वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या सहा तालुक्यांतील एकूण १ लाख ४४ हजार ८५३ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ६६ हजार १२७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात ६५ हजार ५०७ हेक्टरवरील जिरायती पिके, ५४९ हेक्टरवरील बागायती पिके, ६९.८० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण बलच्या (एनडीआरएफ) निकषानुसार जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे ४४ कोटी ५४ लाख ५३ हजार रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ७४ लाख १८ हजार रुपये, फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये प्रमाणे १२ लाख ५६ हजार रुपये असे एकूण ४५ कोटी ४२ लाख रुपये निधीची मागणी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.