
अमरावती : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील २ लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. जिल्हाधिकाऱ्यांनी १४ तालुक्यांच्या १९५९ गावांतील अंतिम पैसेवारी जाहीर केली असून ती ४७ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ स्थितीवर शिक्कामोर्तब झाले असून आठ प्रकारच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात मेळघाट वगळता सर्व तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर २१ या कालावधीत संततधार पावसासह पाच वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे खरिपाच्या किमान दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी या पिकांचे नुकसान झाले. यासाठी शासनाने प्रचलित निकष यापेक्षा जास्त निधी मंजूर केला.
पहिल्या टप्प्यातील निधी जिल्ह्याला प्राप्त झाला. मात्र दुसऱ्या टप्प्यातील निधीची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अंतिम पैसेवारी किती काढली जाते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २१ ला नजर अंदाज ६४ पैसेवारी, यानंतर एक नोव्हेंबरला सुधारित पैसेवारीमध्ये ३०१ गावात ५० पैशांच्या आत व १६५८ गावात ५० पैशांच्या वर पैसेवारी जाहीर केली होती. आता १९५९ गावांमध्ये खरिपाची अंतिम ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.