नगर ः जिल्ह्यात यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच सोयाबीनचे उत्पादन निघाले आहे. यंदा हेक्टरी सरासरी १५ क्विंटल १० किलो उत्पादकता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीची सरासरी उत्पादकता १५ किलो ३६ किलो एवढी होती. जामखेड तालुक्यात सर्वात कमी, तर राहाता व अकोले तालुक्यांत सर्वाधिक उत्पादकता असल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात खरिपात सोयाबीनची पेरणी होते. यंदा एक लाख हेक्टरच्या पुढे पेरणी झाली होती. मात्र शेंगा भरण्याच्या काळात पावसाने ताणले, तर काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसला.
कृषी विभागाने यंदा सोयाबीनचे २१९ पीककापणी प्रयोग केले. त्यातून उत्पादकता निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्याची सोयाबीनची सरासरी उत्पादकता १५ क्विंटल १० किलो २५६ ग्रॅम निघाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामधील सोयाबीनची उत्पादकता १५ क्विंटल ३६ किलो ७५६ ग्रॅम होती. सर्वाधिक यंदा राहाता तालुक्यात १९ क्विंटल ८४ किलो ५०० ग्रॅम उत्पादकता आहे. तर सर्वाधिक कमी उत्पादकता जामखेड तालुक्यात ४ क्विंटल २३ किलो आहे.
नगर तालुक्यात १२ क्विंटल १३ किलो ५०० ग्रॅम, पारनेर तालुक्यात १२ क्विंटल १८ किलो, पाथर्डी तालुक्यात १० क्विंटल ४१ किलो ३३३ ग्रॅम, नेवासा तालुक्यात १६ क्विटंल ८५ किलो, राहुरीत १५ क्विंटल १८ किलो ४३५ ग्रॅम, संगमनेरमध्ये १७ क्विंटल ४८ किलो १२५ ग्रॅम, १८२ ग्रॅम, कोपरगाव तालुक्यात १३ किलो २६ किलो ५६७ ग्रॅम, श्रीरामपूर तालुक्यात १५ क्विंटल १९ किलो ५८३ ग्रॅम उत्पादकता असल्याचे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.