नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमाधारक शेतकऱ्यांना ४६१ कोटींचा विमा मंजूर झाला होता. यातील पहिल्या हप्त्यात ७३ टक्क्यांनुसार ३३६ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले. यानंतर शिल्लक २७ टक्क्यांनुसार १२४.४७ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपनीकडे राज्य शासनाचा हप्ता मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे थकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटींचा विमा परतावा मंजूर झाला होता. या परताव्यातील ७३ टक्क्यानुसार ३३६ कोटी ५३ लाखांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाली आहे. यानंतर राज्य शासनाकडून येणाऱ्या विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांचे २७ टक्क्यांनुसार १२४ कोटी ४७ लाखांची रक्कम अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील एकूण एक हजार ६२२ गावांपैकी ३२८ गावांतील खरिपाच्या पिकांना पुराचा फटका बसला. तर, इतर एक हजार २९४ गावांतही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे विमा कंपनीकडून बुडीत क्षेत्रातील ३२८ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना हेक्टरी दहा हजार २२ ते २२ हजार ९५० रुपये जोखीम रक्कम मंजूर केली आहे.
इतर एक हजार २९४ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना किमान ७२०० ते कमाल १००८ रुपये जोखीम मंजूर केली होती. एकूण ४६१ कोटींपैकी ७३ टक्क्यानुसार ३३६ कोटी ५३ लाखांची रक्कमच खात्यावर जमा झाली. तर, २७ टक्क्यांनुसार १२४ कोटी ४७ लाखांची रक्कम मिळणे बाकी आहे. राज्य शासनाने त्यांचा हिस्सा कंपनीकडे जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होईल, अशी माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.