
नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून याकरिता तरतूद केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांत कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रकार समोर आले होते. प्रयोगशाळेत चाचणीअंती एव्हिएन इन्फुएन्झामुळे (बर्ड फ्लू) बाधित झाल्याने या कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. केंद्र शासनाने २०२१ मध्ये बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. सुधारित कृती आराखड्यानुसार एक किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्षी, त्यांची अंडी व पक्षी खाद्य नष्ट करावे लागतात. त्यानुसार परभणी, लातूर या दोन जिल्ह्यांत अशाप्रकारची कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या संदर्भाने प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले. दरम्यान, पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने पशुपालक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांना अल्पसा आधार म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे निधीची तरतूद करीत भरपाई देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश बुधवारी (ता.२०) काढण्यात आले. त्यामुळे बाधित क्षेत्रातील पशुपालकांना अल्पसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
अशी मिळणार मदत
बदक आणि हंस
गिनी फाऊल आणि टर्की
प्रतिक्रिया ‘शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय ग्रामीण भागात होतो. अफवांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बर्ड फ्लूमुळे कोणतीही व्यक्ती दगावल्याचे सिद्ध केल्यास मी स्वतः त्याला बक्षीस देण्यास तयार आहे. परिणामी, उकळलेले चिकन व अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरी सुद्धा प्रादुर्भावग्रस्त भागासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.’ - सुनील केदार, मंत्री पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.